Friday, May 11, 2007

वादळ

आयुष्यात वादळ येतात अनेक
जी सर्व काही संपवून टाकतात
सगळीकडे अंधार पसरवून टाकतात
व सर्व काही नव्याने सुरु करतात

वादळ असतात अनेक
ती कधी आपले आयुष्य बदलतात
ती कधी आपल्याभोवतीचे आयुष्य बदलतात
पण ही वादळ अजुनसुद्धा कोणी थांबवू शकले नाही

वादळांना सामोरे जावे लागते
जेव्हा ती आपले आयुष्य उध्वस्त करतात
वादळ नकोशीसुद्धा वाटत नाहीत
कारण ती आपल्या आयुष्याचे नवे पर्व निर्माण करतात

अशीच ती वादळ माणसं संपवत असतात
जे त्या वादळाला सामोरे जात नाहीत
व अशीच ही वादळं माणसं घडवत असतात
जी सर्व काही संपले असून सुद्धा . . . . . .
नव्याने उभे राहण्याची आकांक्षा बाळगत असतात

No comments: