Friday, May 11, 2007

भावना जपताना

मनातल्या भावना नाजूक अश्या
प्रेमाच्या भावना मैत्रीच्या भावना
नात्या-गोत्यांच्या भावना
माणसाच्या माणसाबद्दलच्या भावना

जेव्हा भरून येतात त्या भावना
ह्या नाजूक ह्रदयात
ह्या अशांत मनात
त्या काळजात रुजुन जातात

मन भरून येते जेव्हा त्या प्रेमाच्या असतात
आनंद होतो जेव्हा त्या प्रिय व्यक्तिपर्यंत त्या पोहोचतात
पण दु:ख होते जेव्हा त्या पोहोचत नाहीत
दु:ख होते जेव्हा त्या दुखावतात

आनंदाने बहरुन आलेले मन
विरहाने निराश होऊन जाते
आनंदाने फुललेले ते फुल
विरहाने कोमेजून जाते

ह्या भावना एका वाहत्या नदी सारख्या
भरून येतात तेव्हा भरून वाहतात
पण जेव्हा दुखावतात तेव्हा
तेव्हा दु:खरुपी गोट्यांच्या रुपात
वाहायच्या थांबतात

आणि त्या गोट्यांमधून वाहतात
फक्त त्या चमकणाय्रा अश्रुंच्या धारा

भावना जपल्या असत्या तर......
नसती झाली असती ती मन दु:खी
नसते झाले त्या ह्र्दयाचे तुकडे
नसता झाला कोणीही निराश

भावना दु:खावताना
भावना ह्या जपायच्या असतात
प्रेमासाठी सांभाळायच्या असतात
आपल्या आपल्यांसाठी जपाव्या लागतात
प्रिती - प्रेयसीसाठी जपाव्या लागतात
अशीच का होते अवस्था ह्या भावना जपताना!!!

No comments: