Monday, June 27, 2011

माझाच मृत्यू....


माझाच मृत्यू....
माझीच वाट अगदी आतुरतेने पाहतोय......

ह्या दोन ओळी वाचल्यावर मला माझ्या जुन्या कविता आठवल्या.... पुन्हा त्यांसारखी एक कविता लिहावीशी वाटली अन तो विषय मी हाताळला..... विथ अ ड्यू रिस्पेक्ट मी वरील दोन ओळींवरून ही कविता करतोय...अन त्या कवितेसाठी वापरत सुद्धा आहे. अभिप्राय अपेक्षित अन प्रतिक्रियाही....

माझाच मृत्यू....
माझीच वाट अगदी आतुरतेने पाहतोय......

अस लिहीताना अनेक विचार आले..
अनेकदा मी जातोय..
अस बोलणारे चेहरे दिसले...
तेही अगदी माझेच...
मग मी ... मी मात्र नि:शब्द

स्पंदने जशी गोठत जात होती...
श्वासही जणू कोरडे होत जात होते
पण ती भावना...
माझा जीव घेत होती....
होती फक्त एक संकल्पना...
एक कविता...
पण खरच माझा जीव घेत होती...

पाहीलय मी माझ्या मॄत्यूला...
होय...स्वत:ला तुटताना..
माझ्या समोर
माझ्याच काळाला थांबताना

जेव्हा असे विचार येतात..
तेव्हा एक अनोळखी वाट दिसते
पण आपली आपलीशी वाटणारी
अचानक....
कोणीतरी ते दॄष्यच पुसून टाकले....

सारे कसे विझत गेले..
विरक्त होत गेले....
तोच सारे करत होता....
मला त्याच्या तालावर नाचवत होता

अखेर सार काही थांबलं
मी सुद्धा

- शशांक २७-६-२०११

Tuesday, June 21, 2011

विकार...

लिहीण्यास खूप काही असते
पण लिहीले जात नाही....
बोलायचे खूप सारे असते
पण नेहमीच नि:शब्द
सारेच जर बोलता आलं असतं तर...

व्यंग अनेक उभारली ...
अनेक मुखवटे बनवले..
पण त्या मागची व्यंग
दिसेनासी होत जातात
दिसतो तो फक्त दिखावा....

जगण्याचे समास...
वागण्याच्या सीमा
बदलत असतात ....
बदलल्या जातात...
पण....खरच बदल.....
काही विशेष घडवतो का ???

जपण्यास खूप सा-या गोष्टी
मनातले विचार , भावना...
अन खूप काही
पण असतो तो एक विकार...
विचार करण्यास लावणारा....

- शशांक नवलकर २१-६-२०११

Tuesday, June 14, 2011

तो पाऊस होता




थेब ओघळले गालावरूनी....

अश्रूंच्या त्या धारा होत्या...

पाहीले मग स्तब्ध आभाळी

घन-नाद गर्जला होता...तेव्हा

गडद काळोख झाला होता....

शब्द बरसले बघता बघता

चिंब भिजवूनी पाऊस गेला



होता कोणाचा पहिला पाऊस...

होती कोणाची ओली आठवण

सारा झाला चिंब पसारा

पाहूनी तिलाच भिजताना...

होती ती परकीच जणू

पाहत तिला तिचा प्रियकर होता

लेखणी ही भिजली होती

लिहीताना तो पाऊस होता



नशा चढला त्या थेंबांचा

अश्रूही पीणे जमले होते

गोठण्यास काही शिल्लक नव्हते

होते ते ही आटून गेले...

मग आठवलेले मी रडताना

होता तोच वरूण राजा

पाहूनी मजला हसत होता

मग मी ही त्यासवे मैत्री केली...

ढाळता अश्रू भिजत असताना...



ते पानही पार भिजले होते....

लिहीता लिहीता थिजले होते

भिजलो होतो मीही लिहीताना..

कारण त्यातही तो पाऊस होता



- शशांक नवलकर १४.६.२०११

Sunday, June 5, 2011

a poem that died

never imagined
this thought can be inked
but yes i wrote it
about a child that lived....

a mother met me once
i saw her silence in a glimpse
a while later i saw those feelings
as if shattering glass and soaring cries

its easy for me
much easier to type
can anyone revive
that child who died

may be that woman
will take another chance
but will that life come twice
to live the moment of that child

who died.....

- shashank navalkar 05-06-2011

Saturday, June 4, 2011

फक्त तूच बोललास........

खरच तुझं इतकं प्रेम होतं
मग व्यक्त करण्या अवकाश का ?

वाट मलाही पहावी लागली
मग तूझा वेग इतका सावकाश का ?

मागणी तुझी ती जरी होती
कैकदा तू मला विनवूनी मी निराश का ?

प्रेम माझे सुद्धा तुजवर आहे
मग भावनांचा बुद्धीबळ अन त्याचा सारांश का ?

बोललास आज खूप बोललास
मग माझ्या प्रश्नांची उत्तरे तू देशील का ?

- शशांक ४-६-२०११

आज सांगायचे होते तुला.....

वेळ आजही कमी पडतो
तुझ्यासाठी कविता लिहीण्या
हा प्रयासही अपुरा ठरतो..

अजुनही ते तीन शब्द ...
ओठीच उरतात ओले-अपुरे
तरीसुद्धा मी फक्त नि:शब्द

घेऊनी पुन्हा एक नवी सुरूवात
एक शब्द एक ओळ एक कविता...
मग जणू वाटे...असावी ती झंजावात

पण...छे.......मला काही जमलेच नाही
आज सांगायचे होते....नाही...आहे तुला
कायमची फक्त एकदाच माझी होशील......

० शशांक ४-६-२०११