Friday, May 11, 2007

कविता


मी नेहमी विचार करतो की मी कवीता केली तर
माझ्या मनात कधी कसे विचार येतील कुणास ठाऊक
पण कवीता हीच तर माझ्या विचारांची बोली आहे
प्रत्येक वेळी आपल्या मनामध्ये कविता निर्माण झाली तर ती कशी तयार होईल
याची आपल्याला धास्ती असते
पण कधी ती आपल्या मुक्त विचारांची भाषा सुद्धा असते

कविता केली तर आपले प्रेम उल्लेखीन
कविता केली तर मनातली दु:ख अवतरतील
कविता केली तर मनातले सुविचार अवतरतील
कविता केली तर मनतल्या भावना भरून वाह्तील त्या प्रत्येक ओळीतून
जर मी कविता केली तर माझ्या जीवनातले प्रत्येक क्षण मी त्यातून व्यक्त करीन

कविता करणे हेच जर आयुष्य असते तर काय झाले असते!!!
आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्या कवितेच्या एक एक ओळीतून अवतरला असता
जर कविता हेच आयुष्य असते तर कवी कवी नसते तर एखादे डौक्टर वगॆरे असते
जे लोकांचे आजार त्यांच्या सुंदर कवीतांनधून दूर करत असते

कविता ही प्रत्येक प्रेयसी आणि प्रियकरासाठी
कविता ही प्रत्येक दु:खी व्यक्ती साठी आपली दु:ख व्यक्त करण्यासाठी
कविता ही प्रत्येक सामान्यासाठी आपले सामान्य विचार कवितेद्वारे मांडण्यासाठी
अशीच असतीकां ही कविता जर ती मी केली असती तर ..........

No comments: