Thursday, September 29, 2011

एक कविता...माझ्यासाठी




वळणांवरही लिहीताना
अनेकदा नवी वाट दिसली..
पावलांनीही माघार घेतली..
पुन्हा नव्याने साथ दीली
शब्दही तोडके पडतात .
त्या व्यथा मांडताना..
आता कसलीच खंत नाही...
जे भोगले...
ते तर भोगायचेच होते
काही वळणं
अनेक विचार बदलतात..
माझे मार्गही बदलतात..
धूसर झालेली क्षितिजं
नव्याने पारदर्शक दिसू लागतात ..
मग मीही कविता करू लागतो
स्वत:च गाळलेल्या...
नव्याने सापडलेल्या..
स्वप्नांसाठी...

- शशांक

No comments: