Sunday, September 11, 2011

शब्दांतली कळ

शेवटचे शब्द लिहीता लिहीता
अनेकश्या सुरुवाती करून जातो...
आयुष्य कधी संपत नसते..
त्यातला मी मात्र खुंटत राहतो....

भुतकाळातले काही मज उमगले नाही
जणू डगमगता पत्त्यांचा बंगला...
तो जसा कधी स्थिर राहीलाच नाही...
मज आयुष्याचा बांध कधी घट्ट बनलाच नाही...

सांगायचे होते मला काहीसे तिला..
पण तिला माझं काही ऐकायचेच नाही...
त्रास मला ही होतो तिला कणताना बघताना.
तिला मात्र तिची कदरच नाही...

असे शब्दांचे समास किती बदलू...
मग माझा "मी"च स्वत:शी रूसतो..
घडलेल्या गोष्टींत हरवतो...
अन मग असं वाटू लागते की....
का मी हे सगळं आठवतो

- शशांक 11-9-2011 2053hrs

No comments: