Wednesday, September 21, 2011

प्रश्नांतला प्रश्न....

ढाळलेल्या अश्रूंचे मोल...
कुणालाच समजले नाही....
कारण असलेल्या वेदना
कोणी त्यांचा हिशोब करतच नाही

जगावं स्वत:साठी म्हणताना
स्वत:चे असे काही उरतच नाही
कितीही अट्टाहास केला तरीही
येत्या दु:खास नाही म्हणतच नाही

पावलेही कधी उलटी फिरतील
मनी हा प्रश्न कधी विचारलाच नाही..
वाटही बदलली अन नवी दिशाही
तरी मार्ग मी माझा कधी सोडलाच नाही

जगण्याच्या त-हेला बंधन नाही
कोणत्याच व्यंगास मोजमाप नाही
मी तरी असे कीतीदा विचारू,....
कदाचित त्या प्रश्नांना उत्तरच नाही

- शशांक

No comments: