Sunday, August 16, 2009

असे कसे बांधिलेस हे नशीब रे

हल्लीच आलेल्या ’लक’ या चित्रपटातील गाणे "खुदाया वे".........
हे गाणे ऐकून, प्रेरीत होऊन लिहीलेली ही कविता.......

प्रतिक्रिया आणि प्रतिसाद अपेक्षित :

असे कसे बांधिलेस हे नशीब रे

नाती जुळवता जुळवता
दोन ह्र्दयांचे मिलन होऊन गेले
राहून गेलं...ते आयुष्य बदलून गेलं
दोन ह्र्दयांची स्पंदने जोडता जोडता....
असे कसे बांधिलेस हे नशीब रे

स्वप्न पाहतो ज्या नजरांनी
तेच तूटते नात्यांच्या बंधनांनी
चालतो त्या रणरणत्या उन्हातून
चटके कणत आयुष्याची मजा येई
तहानलेल्या मनी....तलाव जवळ वाटे
असे कसे बांधिलेस हे नशीब रे

अश्रू आटूनी मन खारट झाले
नात्यांचे बंधही आज कच्चे झाले
सावल्याही नाहीश्या होऊनी..
शरीर हे रिक्त झाले
का पळावे मी मज स्वत:पासून
असे कसे बांधिलेस हे नशीब रे

कुठ आलो मी आजवर
का? कुणास ठाऊक नाही...
शोधूनी एक नवा मार्ग...
बदलीन मज नशीब सारे..
असे कसे बांधिलेस हे नशीब रे

- शशांक नवलकर ४-८-२००९.

No comments: