Friday, August 19, 2011

rewind.....



शब्दही होतात गढूळ...
जेव्हा आत्मा धूसर होत जातो..
मग मनातही विचारांची वर्दळ....
का हा देह नेहमी चुकत जातो...

पर्व बदलत गेले...
त्या प्रत्येक आठवणींचे
असे अनेक क्षण आले...
निसटणा-या आयुष्याचे

अनेक वेदनांचे चक्र..
मोजलेल्या जखमांचा परिघ...
अन सोसलेल्या त्या कालावधींचे
एक विशाल घन...वर्तुळ...

एक नितांत संदर्भ...
सर्व स्पष्टीकरणांचा...
एक अभ्यास.....
माझ्याच प्रतिमेचा....

- शशांक

No comments: