Friday, August 5, 2011

सेलिब्रेशन....

लोकं प्रेमावर कविता कविता करतात..
विरहावर कविता करतात..
"ती" सोडून गेल्यावर कविता करतात....
"तो" सोडून गेल्यावर!!!
अर्र्र्र मी नोरमल आहे ...
लोकं मैत्रीवर कविता करतात...
"मैत्रीदिन साजरा करण्यापुरतंच"
खरच मैत्रीला इतकीच किम्मत !!
कधी कधी प्रवचन टाईप लिहीतो मी...
पण मला ही कविता वाटते..
कारण माझे शब्द आहेत , त्या मैत्रीखातर...
जी मी गेली २२ वर्ष जपतोय....
त्या मैत्रीखातर.....जी मी गमावली..
त्या मैत्री खातर....
ज्यांनी मला जगायला शिकवले......
खरच मला मैत्री साजरी करावी वाटते...
त्या हर एक क्षणास...
जेव्हा मला आठवतात ते दिवस..
पहिल्यांदाच भेटलेले...
साजरा करावा तो प्रत्येक क्षण
मित्रासोबत घालवलेला...
साजरे करावेत ते शब्द ..
मित्र वा मैत्रीणीसाठी बोललेले..
साज-या कराव्या त्या ओळी....
मैत्रीसाठी लिहीलेल्या...
अन साजरी करावी ही कविता....
मी तुम्हा सर्वांसाठी लिहीली...


० शशांक

No comments: