Friday, August 5, 2011

कविता...गंजत गेली....

अनेक ओवी
तुला लिहीलेल्या..
अनेक चारोळ्या..
मी गाळलेल्या
स्पंदनेही खरडली...
स्वप्नेही बघता बघता रेखाटली...
शब्दांचीही फुले झाली...
अन पारिजातकासम..
चिरडली गेली...
तमा कोणासही नव्हती..
आजही नाही..
पण माला आहे......
ते शब्द माझे होते........
आहेत अन कायम असतील...
पण ही कविता नवी नाही......
अन ह्यात जुनं तसं काहीच नाही.....
तरी ही पुन्हा पुन्हा लिहावीशी वाटते...
बंद पेटीला गंज लागला
तरीही ती उघडावीशी वाटते...
वाचावीशी वाटते...
खंत फक्त नव्याने कित्येकदा झाली....
कारण....ती कविता.......
गंजत गेली...

० शशांक

No comments: