Sunday, January 30, 2011

सांग सख्या रे ...२



नि:शब्द कधी कधी करतात..
ते क्षण.. त्या भावना.. ती माणसं
असे संवाद कैकदा निरर्थकच
...जणू एका अजाण शेतातली जळालेली कणसं
ह्या सगळ्याचा संबंध खरच... असतो का रे ???
सांग सख्या रे...

एक ओळही कधी कधी झोंबते
काट्यांसारखी काळजास रूपते..रक्तबंबाळ करते
त्यातले अमाप भाव...अस्सीम भावना
खूप काही बोलतात...स्पष्टपणे...
पण ते अन त्यातले सारे काही..
समजावणे...जमतेच का?
सांग सख्या रे

असल्या विषयांवर
चारोळी त्रिवेणी..लघुकविता...गझल...
खरच गरजेचे आहे का?
अन मी लिहीलंतर तू वाचशील का..
ए हा प्रेमळ भाव नाही हा...
एक मुद्दा...एक कविता....
ती लिहीताना त्यानंतर पडलेल्या अश्या अनेक प्रश्नांवर...
यमक शोधू नकोस...
कशी वाटली....
सांग सख्या रे

- शशांक नवलकर ३०/१/२०११

No comments: