Friday, November 19, 2010

तू अन मी....




ओळख कशी होते कळतच नाही...
कोणाशी कधीही केव्हाही....
कोणीच बघत नाही....
ह्या मैत्रीतही एक वेगळीच मजा असते..........
इतकी जपावी लागते,
नाहीतर खरच एक सजा असते
कोण म्हणतं नाती मैत्रीतनं घडत नाही..
करून तर बघा खरच काही बिघडत नाही....
मैत्री मैत्री करून कधी कधी काही मिळत नाही....
काळ वेळ मेळ ह्या सगळ्यातनंही मैत्री बनते
तुलाही हे सारं पटतं ना...
तुही कुणाशी तरी मैत्री केली आहेसच ना.....
जेव्हा होते मैत्री अशी.....
तेव्हा गोष्ट असते तुझी माझी....
आपणही दोघे मग अश्या कविता करू लागतो
अन नाव देतो.....
तू अन मी..........

- शशांक नवलकर १८-११-२०१०

No comments: