
वाट पाहूनी कंटाळलो
त्या आठवणी आठवूनही..
आजकाल भिजणे होत नव्हते....
सारे शब्दही सुके सुके..
शेवटी कागद चुरगळून फेकून दिला...
=============================
काही से थेंब अवतरले...
म्हंटलं असेल वरच्याची कॄपा...
"देवा बद्दल नाही बोललो"
पण तो पाऊस होता...
अखेर काहीतरी लिहीणे झालेच....
===============================
रंग मातीचा ओलावला...
तो स्पर्श अंतर्मनास गहिवरला....
शब्द आज चिंब करून जात होते...
पण मला तर भिजावसंच वाटते
पावसातले रंग बघितले..
काळ्या मातीत विरघळणारे...
लाल मातीत विरघळणारे...
अन अनेक रंग बदलणारे....
आठवणी पण सगळ्या रंगीत...
जणू एखादा colour splash"
मग त्या असो २६ जुलै......
अन असो ११ जुलै....
तो पाऊस....ते रंग आणि आठवणी.....
प्रेम म्हणतात पावसात रंगते..
नको तो प्रेमरंग...
हल्ली प्रेम कविता...
जाऊ द्या...भरपूर लिहीलं प्रेमावर
हा...पण तो पाऊस आठवतो
फक्त तिच्या त्या भिजण्यासाठीच....
चला... एक कविता लिहीलीच..
खरच रंग पावसाचे इतके होते..??
की तो पाऊसच होता.."COLORFULLLLLLLL"
- शशांक नवलकर
No comments:
Post a Comment