Sunday, January 2, 2011

भिजलेली पाने

अशीच पाने लिहीता लिहीता
आठवणी चालून गेल्या..
काळजाचे ठोके रोखून गेल्या...
खूप सारे अबोल...बोलून गेल्या
अन मज लेखणीस थांबवून गेल्या...
पण त्या गेल्या त्या गेल्याच
मनातील त्या कोप-याचा ओलावा....
ताजातवाना करून.......
गळून गेलेली पाने मोजत राहीलो..
तर अनेक पानं मिळाली...
कधी लव्ह लेटर्स तर कधी डेड लेटर्स...
आठवणींची शिदोरी संपत नाही....
प्रत्येक क्षण घालवलेल्याचा विसर काही पडतच नाही...

पूर्णविराम दिलेल्या पानी पुन्हा सुरूवात करीतो
नव्या वर्षासाठी आज एक संकल्प करीतो...
पुरे झाल्या आठवून ओल्या सुक्या आठवणी...
आहेत आता भरपूर अश्या जुन्या-नव्या साठवणी...
कोणी कोणासाठी नसतेच मग का थांबावे..
चालतच जावे चालतच जावे...
पण अजुनही तो ओलावा मनी कायम आहे...
त्याचे काय......

लिहीतो आहे अन शोधतो आहे अजुन
ती पाने गळून गेली....
अन तूर्त आठवणे अन लिहीणे...
चालतच राहयचे .... चालतच राहयचे

- शशांक नवलकर २-१-२०११

No comments: