Saturday, December 10, 2011

प्रयत्न....


निसटत्या वाळूसही खंत नसते
ते हात मात्र स्तब्ध असतात...

लिहीलेल्या शब्दांसही तमा नसते
भावनाही कधी कधी अबोल होतात...

क्रोधासही कधी तरी शांती लाभते...
त्या दोघांतले अंतर एक धास्ती असते

चुकल्यावर खरच खूप वाईट वाटते
योग्य मार्ग निवडण्याची सवडच नसते

धपडणे...अडखळणे....पडणे...हरणे....होते.....
कोणासही सतत हरण्याची सवय नसते

पुन्हा नव्याने उभ राहिल्यावर बळ मिळते
जिंकण्याची घाई नको..."अति तेथे माती होते"

- शशांक १०.१२.२०११

No comments: