
खरच....
खूप काही राहून गेले...
तुझ्या भावनांसवे
माझे अश्रूही वाहून गेले.
खूप काही सांगायचे...
काही बोलायचे....
राहून गेले...
तू जाताना....
ते अश्रू आटले असते का?
त्या आठवणींमध्ये धुके दाटले असते का?
ह्या मनातील प्रत्येक प्रश्न....
....असेच सुटले असते का?
ते प्रश्न, प्रश्नच राहून गेले...
तू जाताना....
आता प्रत्येक वाट अलग.....
तिचा अंतही अलग...
सारे काही मुक्त करून जातेयस.......
परत येशील का? त्याच वाटेकडे
परत.......
सारे काही तेच असेल....
पण काही तरी राहून जाईल........
"तू"....जाताना.........
जरी अंत:करणी गारठलो...
तरी जळत राहीन
त्या आठवणींसवे जगत राहीन......
पापण्याही गारठून ओल्या होतील........
तरीही मी जगत राहीन.......
तुझी वाट पाहत राहीन............
खरच.........
जगणे असेच असेल का ?
तू जाताना............
- शशांक नवलकर २८-११-२००९.