Saturday, March 26, 2011

जगाव असंच एकदम दिलखुलास....

विरहानंतरही अश्रू ढाळत बसायच..
उदासीनतेसाठी दारू ढोसत बसायचं
मनासारखं घडलं नाही...
नशीबाल दोश देत बसायचं
काय चाललय यार...
जगावं असं..
एकदम दिलखुलास असावं

ओळीवर कविता खास लिहावी...
अनेकदा मरूनही अमर राहील..
अशी कविता करावी....
प्रत्येकाला वाटतं अस्सच काहीस लिहावं
पण वाचणा-याला कोण सांगणार...
त्यानी कसं वाचावं
विचार न करावा कोणाचाच
एकदम बिनधास्त लिहावं...
शब्दही आपलेच अन लेखणीही...
मग एकदम दिलखुलास जगावं

विटल्या मनाला खेळवावं...
विरक्त न होता सावरावं...
विधाने कित्येक बदलली..बदलतीलच
विषय असे अनेक अन अनेकदा...लिहावं
विशेष काही सांगायच नाही...
फक्त एवढच...
जगाव असंच एकदम दिलखुलास....

- शशांक नवलकर १८*३*२०११